
भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात तिरंगी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात रंगला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं. ऋतुराज गायकवाडने 100व्या सामन्यात हे शतक ठोकलं. (Photo: PTI)