
याआधी दिल्ली शहराला दिल्लिका, दहली, तुघलकाबाद, शाहजहानाबाद, नवी दिल्ली या नावांनी ओळखले जायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे शहर दिल्ली नावाने ओळखले जाते. याआधीही भारतात कलकत्ता या शहराचे नाव बदलून कोलकाता, इलाहाबादचे प्रयागराज, मद्रासचे चेन्नई, बॉम्बेचे मुंबई असे नामकरण झालेले आहे. त्यामुळे दिल्ली शहराचे नावही भविष्यात बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.