
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात उद्योग आणि पर्यावरणाचा समतोल साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. आजच्या काळात केवळ उद्योग उभारून चालणार नाही, तर ते पर्यावरणपूरक असणेही आवश्यक आहे. फडणवीस यांनी उद्योजक भरत गीते यांचे कौतुक केले, जे महाराष्ट्राचे औद्योगिक राजदूत म्हणून दावोससारख्या जागतिक व्यासपीठांवर राज्यासाठी गुंतवणूक आकर्षित करत आहेत. गीते यांच्यासारख्या प्रामाणिक आणि कार्यक्षम उद्योजकांमुळे राज्याला पुढे जाण्यासाठी बळ मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.
शासनाने उद्योजकांना पूर्ण शक्तीनिशी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. इज ऑफ डुईंग बिझनेस, कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आणि कायदा व सुव्यवस्था या तीन स्तंभांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश फडणवीस यांनी दिले. पुढील पाच वर्षांसाठी औद्योगिक विजेचे दर वाढणार नाहीत, याची खात्री दिली.