भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण

भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण


आज रंगपंचमीच्या दिवशी भारतामध्ये खंडग्रास आणि खग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे. हे वर्षातील एकूण चार ग्रहणांपैकी दुसरे आणि भारतातून दिसणारे शेवटचे ग्रहण आहे. यापूर्वी एक सूर्यग्रहण झाले आहे. अरुणाचल प्रदेशात खग्रास चंद्रग्रहण पूर्णपणे दिसणार असले तरी, मुंबईत ते अजिबात पाहता येणार नाही.

विदर्भामधून हे ग्रहण सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी सुरू होऊन रात्री पावणे आठ वाजता संपेल. गडचिरोली येथे सुमारे 35 टक्के, तर चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये 25 ते 30 टक्के खंडग्रास ग्रहण दिसेल. परभणी, पुणे आणि औरंगाबाद येथे 10 ते 20 टक्के ग्रहण दिसण्याची शक्यता आहे. हे ग्रहण क्षितिजावरून दिसणार असून, चंद्र ग्रहणातून उगवताना पाहता येईल. विद्यार्थी आणि सर्व नागरिकांनी या खगोलीय घटनेचा लाभ घ्यावा आणि आनंद अनुभवावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *