Headlines

भारत देणार अमेरिकेच्या हातावर तुरी, भारत अमेरिका व्यापार करारावर अत्यंत मोठे अपडेट, तो निर्णय..

भारत देणार अमेरिकेच्या हातावर तुरी, भारत अमेरिका व्यापार करारावर अत्यंत मोठे अपडेट, तो निर्णय..
भारत देणार अमेरिकेच्या हातावर तुरी, भारत अमेरिका व्यापार करारावर अत्यंत मोठे अपडेट, तो निर्णय..


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिका व्यापार करारादरम्यान भारताला अत्यंत मोठा धक्का दिला. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय बाजार आपल्या हातात हवा. व्यापार कराराकरिता भारतावर प्रचंड दबाव अमेरिकेचा होता. शेवटी दोन्ही देशातील व्यापार करार पूर्ण झाली असून अंतिम टप्प्यात तांत्रिक काम सुरू आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या व्यापार कराराबद्दल घोषणा होईल. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारानंतर भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे वारंवार सांगितले जात आहे. भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला. व्यापार करारादरम्यान हा टॅरिफ कमी करून 18 टक्क्यांवर आणला. भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिताही अमेरिकेचा भारतावर अत्यंत मोठा दबाव होता. यादरम्यानच भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारत असताना पुन्हा एकदा भारताला अमेरिकेने दणका दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कदायक निर्णय घेत थेट भारतातून होणाऱ्या सौरऊर्जेच्या आयातीवर तब्बल 126 टक्के टॅरिफ लादण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. म्हणजे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सोलर पॅनेलवर आता तब्बल 126 टक्के टॅरिफ लागणार आहे. इतका मोठा टॅरिफ असल्याने भारतातून अमेरिकेत सोलर पॅनेल पाठवणे उत्पादकांना अजिबात परवडणारे नाही.

या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील सुरू असलेल्या व्यापार कराराला धोका निर्माण होऊ शकतो. कारण भारतावरील टॅरिफ कमी केल्यानेच भारतानेही व्यापार करार पुढे नेले. मात्र, अमेरिकेकडून एक एक करून भारताच्या काही वस्तूंवर मोठा टॅरिफ लावला जात आहे. ज्यानंतर त्या गोष्टी अमेरिकेच्या बाजारपेठेपर्यंत अजिबात पोहोचू शकत नाहीत.

ही अमेरिकेची चाल असल्याचे बोलले जात आहे. मार्चमध्ये व्यापार करारावर सह्या झाल्यानंतरही अमेरिका अशी धक्कादायक निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा आहे. यावर आता भारत नक्की काय भूमिका घेतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. भारताच्या सोलरवर टॅरिफ लावण्याचे एक वेगळे कारण तसे अमेरिकेकडून देण्यात आले.  भारताने अमेरिकेवर विश्वास ठेवून चूक केल्याचे बोलले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *