
महाराष्ट्र राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
शरद पवार यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. सात जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीकडे अधिक संख्याबळ असल्यामुळे सहा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. जर आठवा अर्ज आला तरच निवडणूक होईल, अन्यथा ही निवडणूक बिनविरोध पार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून चार उमेदवार, तर शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे आणि महायुतीतील इतर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.