Headlines

रेरा कायदा सामान्यांसाठी की बिल्डरांच्या फायद्यासाठी?, सर्वोच्च न्यायालय संतापले, म्हणाले….

रेरा कायदा सामान्यांसाठी की बिल्डरांच्या फायद्यासाठी?, सर्वोच्च न्यायालय संतापले, म्हणाले….
रेरा कायदा सामान्यांसाठी की बिल्डरांच्या फायद्यासाठी?, सर्वोच्च न्यायालय संतापले, म्हणाले….


सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका सुनावणी दरम्याने रिएल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA)च्या कार्यप्रणालीत कठोर शब्दात टीका केली आहे. कोर्टाने रेरा आता डिफॉल्टर बिल्डर्सना वाचवण्याचा मार्ग बनली आहे. यामुळे रेराला समाप्त करायला हवे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमपूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमालिया बागची यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान कठोर शब्दात रेराच्या कारभारावर टीका केली आहे.
सर्व राज्यांनी आता याचा गंभीरपणे विचार करायला हवा की अखेर रेरा संस्थेची स्थापना अखेर कशासाठी केली होती ? हा कायदा सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी आणला होता की बिल्डर्सच्या सुरक्षेसाठी हा कायदा आणला होता ? असे न्यायमूर्तींनी सुनावणे. मुख्य न्यायमूर्ती सुर्यकांत यावर टीप्पणी करताना म्हणाले की , ‘डिफॉल्टर बिल्डर्सना सुविधा देण्याशिवाय ही संस्था आणखी काही करु शकत नाही. त्यामुळे या कायद्याला संपूर्णपणे समाप्त करणेच चांगले होईल’

कार्यलयाच्या शिफ्टींग वाद –

सर्वोच्च न्यायालय रेरा कायद्यावर केलेली टीप्पणी ही सुप्रीम कोर्टात हिमाचल प्रदेशातील एका प्रकरणा दरम्यान केली. हिमाचल प्रदेशातील रेराचे कार्यालय सिमला हून धर्मशालात शिफ्ट करण्याचे नोटीफिकेशन हिमाचल सरकारने काढले होते. या प्रकरणाच्या विरोधात अपिल दाखल करण्यात आले होते आणि हे प्रकरण हिमाचल प्रदेश हायकोर्टात पोहचले.

गेल्यावर्षी हायकोर्टाने राज्य सरकारचे हे नोटीफिकेशन रोखले होते. हायकोर्टाने म्हटले होते राज्य सरकाने हे रेरा कार्यालय शिफ्टींगचे नोटीफिकेशन पर्यायी जागेचा शोध घेण्याआधीच काढले होते. हायकोर्टाने आपल्या आदेशात असेही म्हटले होते की १८ आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना दुसरे बोर्ड आणि महामंडळात समायोजित करण्याचे म्हटले आहे. ज्यामुळे रेराचे कामकाज संपूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. या तर्कांच्या आधारे हायकोर्टाने १३ जून २०२५ च्या नोटीफीकेशनला स्थगिती दिली होती.

जनतेला त्रास होऊ नये याची काळजी घ्या –

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हायकोर्टाचा तो निकाल बदलला आणि राज्य सरकारला मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला रेरा कार्यालय सिमलातून धर्मशाला शिफ्ट करण्याची अनुमती दिली आहे. मात्र, कोर्टाने या प्रक्रियेचा सर्वसामान्य जनतेला काहीही त्रास होऊ नये असेही आदेश दिले आहेत.
खंडपीठाने निर्देश दिले की केवळ रेरा कार्यालयच नाही, तर अपिलीय ट्रयुबनलला देखील धर्मशाला येथे शिफ्ट करावे, त्यामुळे लोकांना अपिलासाठी खेटे मारावे लागू नयेत. राज्य सरकारच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता माधवी दीवाण यांनी युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टाने याआधी अशाच एका प्रकरणात हिमाचल प्रदेशातील मागासवर्ग आयोगाचे मुख्यालय देखील सिमलाहून धर्मशाला येथे हलवण्याच्या हायकोर्टाची स्थगिती उठवली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *