
अमेरिका आणि इराण युद्ध भडकले आहे. इराणकडून अमेरिकेच्या हवाई दलातील विमान पाडण्यात आले. होर्मुज खाडीच्या जवळ ही घटना घडली आहे. अजूनही इराणकडून ही खाडी पूर्णपणे सुरक्षित करण्यात आली नाही. भारताचे जहाज होर्मुजमधून सोडली जात आहेत. मात्र, भारतात या युद्धामुळे एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला. आता भारतासाठी होर्मुज खाडीतून अत्यंत आनंदाची बातमी आली. भारतीय ध्वज असलेल्या ग्रीन सान्वी या एलपीजी टँकर जहाजाला होर्मुज खाडीतून सोडण्यात आले. या जहाजात अंदाजे साधारणपणे 44,000 मेट्रिक टन एलपीजी आहे. ही भारतासाठी फक्त आनंदाचीच नाही तर मोठी दिलासादायक बातमी आहे. युद्धाला सुरूवात झाल्यापासून सरकारने निर्णय घेत थेटपणे व्यावसायिक सिलेंडरचे वितवरण बंद केले. घरगुती गॅसचाही तुटवडा आहे. यादरम्यानच हे जहाज होर्मुजमधून निघाले.
शुक्रवारी जहाजाने होर्मुज खाडी पार केल्याची माहिती मिळतंय. हे जहाज आता 6 एप्रिलपर्यंत भारतात येण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात होर्मुझची सामुद्रधुनी पार करणारे हे भारताचे सातवे जहाज आहे. होर्मुज खाडीत अडकलेले जहाज एका मागून एक सोडले जात आहेत. होर्मुज खाडी ओलांडल्यानंतर भारतीय नाैदलाच्या संरक्षणात जहाला आणले जातंय.
इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती भयंकर आहे. मोठे हल्ले जहाजांना टार्गेट करून केले जात आहेत. जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, ग्रीन सान्वी पर्शियन नांगरून होर्मुज खाडीतून भारताच्या दिशेने निघाले आहे. या जहाजाना होर्मुज खाडी पार केली. हे जहाज आता थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहे. हे जहाज मुंबईमध्ये दाखल होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजात 44,000 मेट्रिक टन एलपीजी आहे. हे जहाज भारताच्या दिशेने येत असल्याने मोठा दिलासा मिळालाय. एलपीजीचा तुटवडा भारतात आहे. या काळात भारताचे जुने मित्र भारतासोबत उभे आहेत. रशियाकडूनही भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल पाठवले जात आहे. इतर देशांमध्ये कच्चा तेलाची मोठी वांदेवाडी आहे. पाकिस्तानमध्ये स्थिती भयंकर आहे.