
मुलाखतीत सुनिधीने स्पष्ट शब्दांत सांगितले, “मी आयुष्यात अनेक चुका केल्या, पण बॉबी खानशी केलेले ते लग्न ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती. सुदैवाने वेळेत मला जाणीव झाली की मी चुकीच्या ठिकाणी अडकले आहे. देवाचे लाख लाख आभार की त्याने मला त्या नात्यातून बाहेर पडण्याची बुद्धी दिली.” सुनिधी आज आपल्या पहिल्या लग्नाला एक मोठा धडा समजते. तिच्या मते, त्या एका चुकीच्या निर्णयामुळे तिला आयुष्याची कडवट बाजू खूप लवकर समजली. त्यामुळे ती अधिक मजबूत आणि खंबीर बनली.