Headlines

विनाअनुदानित शाळांना दिलासा, 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान; मंत्री पंकज भोयर यांची घोषणा

विनाअनुदानित शाळांना दिलासा, 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान; मंत्री पंकज भोयर यांची घोषणा
विनाअनुदानित शाळांना दिलासा, 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान; मंत्री पंकज भोयर यांची घोषणा


Mumbai : मुंबईच्या आझाद मैदानात मागील आठवड्यात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं. या आंदोलकांना अखेर यश आलं आहे. येत्या 1 ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा राज्य मंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत केली आहे. खासगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा आणि कार्यरत शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येत्या 1 ऑगस्टपासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा देण्यासाठी आवश्यक निधीस मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. या वेतनासाठी दरवर्षी 970 कोटी 42 लाख रुपये एवढा खर्च होणार आहे.

राज्य सरकारनं ऑक्टोबर 2024 मध्ये शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार सुरुवातीला 20 टक्के अनुदान देण्यात येणार होतं. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. शाळांना प्रत्यक्ष निधी वितरित करण्यात आलेला नव्हता. या निर्णयानंतर दोन अधिवेशनं पार पडली, तसंच तिसरं अधिवेशन सुरू असतानाही सरकारकडून टप्पा अनुदानासाठी आवश्यक असलेली पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली नव्हती. परिणामी, शिक्षक समन्वय संघानं तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाकडून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं.

खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक

बीड मधील खाजगी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलंय. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग गुणवत्ता विकास आढावा बैठकीत याबाबतचे निर्देश दिले गेलेत. 

स्वयं अर्थसहाय्यित शाळातील शिक्षक कर्मचाऱ्यांचे चारित्र्य संबंधित पोलीस विभागामार्फत करून घ्यावे, विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेटी दिल्यास शाळा व्यवस्थापनाने ते सादर करावे.. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी विशेष अंमलबजावणी करावी अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

सफाई कर्मचाऱ्याला दिली शिक्षकाची जबाबदारी 

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव नगर परिषदेत स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला चक्क प्राथमिक शाळेत शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षण राज्य मंत्री म्हणून स्वतः पालकमंत्री असणाऱ्या जिल्ह्यात ही धक्कादायक बाब एका पत्रामुळे समोर आली आहे. पुलगाव येथील नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या  शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा क्रमांक 4 येथे स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या  चेतन रमेश चंडाले याला अतिरिक्त जबाबदारी देत शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली. तसे पत्रच मुख्याधिकाऱ्यांनी काढले आहे. सदर पत्रावर मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी देखील आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *