Headlines

'हा सरसकट जीआर नाही, पुराव्यांचा GR, मी भुजबळांना आश्वस्त केलंय'; मुख्यमंत्र्यांनी सांगितला शासन निर्णयाचा अर्थ

'हा सरसकट जीआर नाही, पुराव्यांचा GR, मी भुजबळांना आश्वस्त केलंय'; मुख्यमंत्र्यांनी सांगितला शासन निर्णयाचा अर्थ
'हा सरसकट जीआर नाही, पुराव्यांचा GR, मी भुजबळांना आश्वस्त केलंय'; मुख्यमंत्र्यांनी सांगितला शासन निर्णयाचा अर्थ


मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या मागण्या मान्य करत शासनाने हैदराबाद गॅझेटियरचा शासन आदेश जारी केला असून मराठा समाजाने आपलं आंदोलन मागे घेतलं. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर आझाद मैदानावर एकच जल्लोष झाला. दुसरीकडे शासनाच्या या जीआरमुळे ओबीसी समाज नाराज झाला असून ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्यात येत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी मारत आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र, छगन भुजबळ (Chhagan bhujbal) हे नाराजी नाहीत, मी त्यांना आश्वस्त केलं आहे. हा सरसकटचा जीआर नाही, हा पुराव्यांचा जीआर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

काही लोकं जाणीवपूवर्क गैरसमज निर्णम करतात. पण, आम्ही जे राजकारण शिकलो, त्यामध्ये पथका अंतिम लक्ष नही है, सिंहासन चढते जाना सब समाज को लिए साथ मे आगे है बढते जाना है, आमचं ब्रीद वाक्य आहे, असे म्हणत मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जात आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचवलं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे. महाराष्ट्र जडणघडणी समाजाने मोठं योगदान दिलं आहे , या समाजाचं कल्याण झालाच पाहिजे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली.

छगन भुजबळ हे कॅबिनेटमधून कुठेही निघून गेले नाहीत, त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. मी त्यांना आश्वस्त केलं आहे, आपण जो जीआर काढलेला आहे तो सरसकटचा नाही, त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही, हा पुराव्याचा जीआर आहे. मराठवाड्यामध्ये इंग्रजाचं राज्य नव्हतं, निझामाचं राज्य होतं. इंग्रजाचे पुरावे इतर ठिकाणी मिळतात, पण मराठवाड्यात नाही. मराठवाड्यातले पुरावे निझामाकडे म्हणजे हैदराबादमध्ये मिळतात, तिथले पुरावे आपण ग्राह्य धरले आहेत, जे खरे हक्कदार आहेत. यात कोणालाही खोटेपणा करता येणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, अनेक ओबीसी संघटनानी या जीआरचं स्वागत केलं आहे, असेही ते म्हणाले.

एका समाजाचं काढून दुसऱ्याला देणार नाही

आमच्या मनात शंका नाही असं सांगितलं आहे, भुजबळ यांच्या मनातील शंका दूर करू, इतरांच्याही मनातील शंका दूर करू. ओबीसींना सुद्धा माहिती आहे, जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यत ओबीसींवर अन्याय होणार नाही. एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार असं होणार नाही. मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार. कोणाचं काढून कोणाला देणार नाही, आम्ही दोन समाजाला एकमेकांसमोर कधी आणणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी मराठा आणि ओबीसी समाजात दुरावा निर्माण होणार नसल्याचेही सूचवले आहे.

जीएसटी दरकपातबाबतही बोलले सीएम

दरम्यान, केंद्र सरकारने जीएसटी दरात कपात केल्यासंदर्भात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वन नेशन-वन टॅक्सप्रमाणे GST लागू केलाय, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *