
Eknath Shinde Minister Unhappy On BJP मुंबई: मुंबईतील मंत्रालयात आज राज्याची मंत्रिमंडळ बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. शिवसेना शिंदे गटाचे कोणतेच मंत्री आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले (shinde camp not attending cabinet meeting) नाही. शिवसेनेकडून केवळ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते.
डोंबिवलीतलं भाजपचं ऑपरेशन लोटस शिवसेना शिंदे गटाला चांगलेच जिव्हारी लागल्याचं समोर येत आहे. कारण मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दालनात गेले. यावेळी तुम्ही जे करताय, ते योग्य नाही, असं शिवसेनेचे मंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाले. तसेच कल्याण-डोंबिवलीतल्या ऑपरेशन लोटसवरुन देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार देखील केली. तुम्ही उल्हासनगरमध्येही हेच करताय, असं देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
शिंदे गटाचे कोणते मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अनुपस्थित?
उदय सामंत
प्रताप सरनाईक
दादा भुसे
संजय शिरसाट
प्रकाश आबिटकर
भरत गोगावले
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांची नाराजीची कारणे काय? (why shivsena shinde camp minister unhappy?)
- भाजप सेनेचे नेते ,नगरसेवक व पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेत आहेत.
- ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उम्मीद्वार ला भाजप आपल्या पक्षात घेत आहे.
- शिंदेच्या अनेक नेत्यांना किव्हा पालकमंत्री ना , विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात किव्हा निधी वळवला जातो
- येऊ घातलेल्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही.
- निधी मिळवण्यासाठी ही शिंदेच्या मंत्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- संभाजी नगर ,कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने असे प्रवेश करून घेतलेत ,किव्हा युतीचा धर्म पाळला नाही.
भाजपाच्या फोडाफोडीमुळे शिवसेनेचे मंत्री नाराज-
शिंदे गटाच्या नाराजीमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सुरु असलेली फोडाफोडी कारणीभूत असल्याचे समजते. आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जातीने उपस्थित होते. भाजपने कालपासून ही बातमी गुप्त ठेवत श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या नगरसेवकांना गळाला लावले होते.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे काय म्हणाल्या? (Sushama Andhare On Eknath Shinde)
हे सर्व विधिलिखीत आहे. ज्याक्षणी एकनाथ शिंदेंनी व्हाया सुरत-गुवाहाटीचा रस्ता पकडला होता. त्याक्षणी भाजप कशा पद्धतीने वापरुन घेईल, हे त्यांच्या कपाळावर लिहून ठेवलेलं होतं. उदय सामंत यांच्यासमोर त्यांनी राणेंचं घर फोडून त्यांनी राणेंसमोर एक आव्हान उभं केलंय. दादा भुसे यांच्यासमोर आता एक अद्वय हिरेंचं आव्हान उभं केलंय. ज्या पद्धतीने शिंदेंच्या आमदारांसमोर भाजप एक-एक आव्हान उभं केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आर्श्चय वाटायला नको. कारण एकनाथ शिंदेंनी स्वत:ला मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी या सगळ्यांना राजकीय आत्महत्या करण्यास भाग पाडले, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय समजूत काढतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इकडे येऊन सांगताय आम्हाला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मागे भाजपने शुक्लकाष्ट लावलेलं आहे, त्यामुळे कुबड्या म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना पद्धतशीरपणे बाजूला काढण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा