
सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावरील टीकेला प्रत्युत्तर देताना, मला कशासाठी व्हिलन केले, याची मला पूर्ण माहिती आहे असे म्हटले आहे. काही प्रमुख नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली, याबद्दल ते उत्तर देऊ शकले नाहीत, असेही तटकरेंनी नमूद केले. आमचा नेता निवडण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि पक्षाने नेता निवडल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या अनुमतीने शपथविधी पार पडला. यात कोणाला काही शल्य वाटले असल्यास, त्यांनी सांगावे, असे तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षापदाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. जनतेच्या आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात जो निर्णय आहे, तोच निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. भारतीय निवडणूक आयोगाने आम्हाला घटनात्मक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. कालच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. हा निर्णय योग्य होईल आणि तो लवकरच निश्चितपणे घेतला जाईल, असे तटकरे यांनी नमूद केले.