भाजप म्हणजे विषारी साप! कधीही नाग पाठवू शकतात, दोस्ती नाही, दुश्मनीही नाही; बच्चू कडू यांची खोचक टीका

भाजप म्हणजे विषारी साप! कधीही नाग पाठवू शकतात, दोस्ती नाही, दुश्मनीही नाही; बच्चू कडू यांची खोचक टीका
भाजप म्हणजे विषारी साप! कधीही नाग पाठवू शकतात, दोस्ती नाही, दुश्मनीही नाही; बच्चू कडू यांची खोचक टीका


राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असताना लँडिंगपूर्वी त्यांच्या विमानात बिघाड झाला. त्यानंतर त्यांच्या विमानाचा स्फोट झाला. या विमान अपघातावर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. दरम्यान, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वक्तव्य करत भाजपवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजप म्हटलं की संशयावरच पाहते.. त्यांनी खांद्यावर हात टाकलं तरी लोक म्हणतात हा मेला, त्यांच्या खांद्यावर हात टाकला तरी पण.. ती सापासारखी लोक आहेत. भाजप म्हणजे विषारी साप आहे. भाजपसोबत दुश्मनी पण नाही दोस्ती पण नाही. हम तो दुश्मनी कर चुके है.. ते कधीही नाग पाठवू शकतात’ असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, पूर्वी सिविल सर्जनला औषध घेण्याचे अधिकार होते. आता सगळे औषधी घेण्याचे अधिकार ठेवले मंत्रालयात. लावला गेम बरोबर कमिशन खा औषध महाग करा. न खाऊंगा ना खाने दूंगा सबसे ज्यादा देश के अंदर खाने वाला है तो बीजेपी है… टेंडर देण्यासाठी पैसे खाते. एमआरइजीएसचे पैसे अजून भेटले नाही. लाडकी बहिणीचे पैसे महिन्याचे पैसे भेटले नाही. अपंगाचे पगार वेळेवर नाही. ज्याला दोन पाय नाही साले हो त्याचे पगार वेळेवर देत नाही.. तुमच्या कुठं माराव रे… माराची वेळ नाही आली आता.. आम्ही पाहतोय वेळ आली तर मारू कानफटात.

लाडकी बहिण योजनेवर काय म्हणाले?

लाडक्या बहिणीच्या नावानं पंधराशे रुपये टाकून मतं भेटू शकले असणार पण स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तुमचे पैसे किती लुबाडले याची गणित लावावे लागेल. इकडून पैसे दिले आणि मीटरच्या माध्यमातून सरकारन पैसे घेतले. कर्जमाफी भेटली नाही तर महाराष्ट्रात रेल्वेचा चाक धावू देणार नाही. आम्ही गनिमी कावा करू. कामगाराला काढलं तर काय कामगार न्यायालयात जा.. चार चार वर्षे रिझल्ट लागत नाही. कोर्टाचे काय हाल आहेत सर्वांना माहीत आहे. कोर्ट आपल्या बाजूने राहिल का नाही याची भीती वाटते असे बच्चू कडू म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *