
अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी व्यापारी डील झाली आहे. या ट्रेड डीलचा दोन्ही देशांना देखील मोठा फायदा होणार आहे. अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील होताच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषण केली. अमेरिकेनं भारतावर असलेला टॅरिफ कमी केला आहे. सुरुवातीला भारतावर अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लावला होता. तो आता 18 टक्के करण्यात आला आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जशी बंग्लादेशला टॅरिफमध्ये अमेरिकेकडून सूट मिळाली तशी भारताला देखील मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्यासाठी अमेरिकेकडून एक अट ठेवण्यात आली आहे, या अटीची पूर्तता केली तरच भारताला टॅरिफ संदर्भातील लाभ मिळू शकतो. याबाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली आहे.
पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलनुसार सध्या टॅरिफमध्ये बग्लादेशला जी सूट मिळत आहे, तशीच सूट भारताला देखील मिळणार आहे. अमेरिकेनं बाग्लादेशमधून निर्यात होणाऱ्या कापडांवर शून्य टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे तेव्हाच शक्य होणार आहे, जेव्हा त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कापूस आणि इतर कृत्रिम धागे हे अमेरिकेमधून खरेदी केले जाणार आहेत, आणि त्यापासून जे कापड तयार केलं जाईल, त्यावर अमेरिकेत शून्य टक्के टॅरिफ लावला जाणार आहे.
पुढे बोलताना पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे की, या ट्रेड डीलनंतर आता बांग्लादेशला जो फायदा मिळणार आहे तसाच फायदा हा भारताला देखील मिळू शकतो. जर एखादी भारतीय कंपनी अमेरिकेमध्ये उत्पादीत होणाऱ्या कापसापासून कापड बनवत असेल आणि ते जर अमेरिकेत निर्यात केलं तर त्या कापडांवर शून्य टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. दरम्यान अमेरिकेच्या या अटीचा भारतीय शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भारतामधील कापूस उत्पादन शेतकरी संकटात सापडू शकतात. कापूस उत्पादक शेतकरी आधीच अनेक संकटांना तोंड देतोय, त्यामध्ये आता हे नवं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.