
“रायगडावर शूट करताना खूप आनंद झाला. तिथे अनेक गोष्टी प्रत्यक्ष पाहायला आणि शिकायला मिळाल्या. आम्ही सतत एकाच विचारात होतो, ज्या वास्तूंवर एकेकाळी महाराज वावरले असतील, त्याच वास्तूंवर आज आपण वावरतो आहोत, याहून मोठी आणि अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी दुसरी नव्हती. ‘कमळी’ ही रायगडावर शूट करणारी पहिली मालिका आहे,” असं तिने पुढे सांगितलं.