
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काही प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याकरिताच अजित पवार बारामतीच्या दिशने निघाले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार या विमान अपघातात जखमी झाले आहेत. मात्र, त्यानंतर हैराण करणारी बातमी पुढे आली आणि स्पष्ट झाले की, अजित पवार यांच्यासह विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासातच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडली आहेत. त्यामध्येच आता खळबळ उडवणारी माहिती पुढे येत असून अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल संशय अधिकच वाढल्याचे बघायला मिळतंय. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी 28 जानेवारी 2026 रोजीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मात्र, सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने हे देण्यास नकार दिला.
सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याने संशय अधिक वाढला. हेच नाही तर नितीन यादव यांनी थेट न्यायालयात याविरोधात धाव घेतली. नितीन यादव यांनी 28 जानेवारीचे सकाळी 6 ते 9 दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मुंबई विमानतळावरील हालचाली त्यांना बघायच्या होत्या. कारण ज्यावेळी अजित पवार मुंबई विमानतळावर पोहोचले, त्यावेळी नक्की काय घडले हे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बारीकपणे तपासायचे होते.
अजित पवार घरातून किती वाजता निघाले आणि नक्की काय घडले हे तपासायचे होते. कारण अजित पवार विमानतळावर पोहोचल्यानंतरचा त्यांचा तो शेवटचा व्हिडीओ असेल. हे सीसीटीव्ही व्हिडीओ मिळणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. आता कोर्ट या प्रकरणात नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.