
राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून काही प्रमाणात अलिप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली. विलीनीकरणानंतर ते सक्रिय राजकारणापेक्षा सामाजिक कामांमध्ये अधिक लक्ष घालणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे, असा आग्रह अजित पवार यांनी धरला होता. विलीनीकरणानंतर पक्षाची प्रमुख जबाबदारी अजित पवारांकडे सोपवली जाणार होती दरम्यान, शरद पवार यांची राज्यसभेची मुदत एप्रिल महिन्यात संपत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले की, विलीनीकरणाबाबत गेल्या महिनाभरापासून दोन्ही गटांची चर्चा सुरू होती. मात्र सध्या परिस्थिती शांत असून या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.