
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी काल राऊत यांची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणी संसदेत आवाज उठवण्याची विनंती केली. राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रोहित पवारांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीए विरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती फेटाळण्यात आली.
राऊत यांच्या मते, सरकार या घटनेला अपघात म्हणत असले तरी ते सदोष मनुष्यवध आहे. सरकार हे प्रकरण हलक्यात घेत असून, तक्रार दाखल करून न घेतल्याने काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही राऊत यांनी केला.