भारताचं टेन्शन मिटलं! इराणकडून भारताला सर्वात मोठा दिलासा, थोड्याच वेळात होणार घोषणा

भारताचं टेन्शन मिटलं! इराणकडून भारताला सर्वात मोठा दिलासा, थोड्याच वेळात होणार घोषणा
भारताचं टेन्शन मिटलं! इराणकडून भारताला सर्वात मोठा दिलासा, थोड्याच वेळात होणार घोषणा


इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगातील तेल पुरवठ्यावर परिणाम झाल आहे. इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांना प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजांवरही याचा परिणाम झाला आहे. अशातत आता भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी भारताला दिलासा देणारे विधान केले आहे. भारताच्या जहाजांना हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यास परवानगी मिळू शकते असं फतहाली यांनी सांगितलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणकडून भारताला मोठा दिलासा

इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांबाबत आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. जहाजांना या मार्गाने प्रवास न करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच फतहाली यांना विचारण्यात आले की, भारताला होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मिळेल का, यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘हो, कारण भारत आमचा मित्र आहे. दोन-तीन तासांत असे घडताना दिसेल.’ या जलमार्गावर परिणाम झालेला असताना इराणकडून हे विधान आल्याने आता भारताची सर्वात मोठी डोकेदुखी मिटण्याची शक्यता आहे.

भारत आणि इराणचे हितसंबंध एकसारखे

भारताला होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाता येईल का? असा थेट प्रश्न विचारल्यावर मोहम्मद फतहाली यांनी म्हटले की, ‘हो, हो, भविष्यात तुम्ही असे पाहू शकता. मला वाटते की दोन-तीन तासांत असे काही घडू शकते.’ फतहाली यांनी भारताला इराणसाठी एक महत्त्वाचा भागीदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘या भागात इराण आणि भारताचे हितसंबंध एकसारखे आहेत, असे आम्हाला वाटते.’

भारत आम्हाला मदत करतो

भारत-इराण यांच्यातील संबंधांवर बोलताना मोहम्मद फतहाली यांनी म्हटले की, ‘हे आमचेही दु:ख आहे आणि त्यांचेही. त्यामुळेच भारत सरकार आमची मदत करते आणि आम्हीही भारत सरकारला मदत केली पाहिजे, कारण आमचे परस्पर विश्वास आणि समान हितसंबंध आहेत. या प्रदेशात भारत आणि इराणचे सामायिक हित आहेत.’ अशातच आता इराणमधील सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी भारतातील इराणी दूतावासाला दोन्ही देशांमधील संबंध मजबूत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *