Headlines

भर समुद्रात रात्री मोठा खेळ, भारताकडून चीनला जबर धक्का, तेलानं भरलेलं जहाज…

भर समुद्रात रात्री मोठा खेळ, भारताकडून चीनला जबर धक्का, तेलानं भरलेलं जहाज…
भर समुद्रात रात्री मोठा खेळ, भारताकडून चीनला जबर धक्का, तेलानं भरलेलं जहाज…


गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. अशातच आता दक्षिण चीन समुद्रात मोठी घडामोड पहायला मिळाली. रशियातून लाखो बॅरल कच्चे तेल घेऊन चीनकडे जाणारी अनेक टँकर जहाजे आता अचानक मार्ग बदलून भारतातील बंदरांकडे वळली आहेत. यामुळे चीनला मोठा दणका बसला आहे. याबाबात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समुद्रातच जहाजांचा मार्ग बदलला

शिप-ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार, अॅक्वा टायटन नावाचे एक विशाल जहाज जानेवारीच्या शेवटी बाल्टिक समुद्रातील बंदरातून रशियन कच्चे तेल घेऊन निघाले होते. हे जहाज चीनमधील रिझाओ बंदरात जाणार होते. पण मार्चच्या मध्यात, दक्षिण-पूर्व आशियाई समुद्रात पोहोचल्यानंतर या जहाजाने अचानक यू-टर्न घेतला. आता हे जहाज 21 मार्च रोजी भारतातील न्यू मंगळूर बंदरात पोहोचणार आहे.

वोर्टेक्स लिमिटेडच्या आकडेवारीनुसार रशियन तेल घेऊन जाणाऱ्या किमान सात टँकरांनी समुद्राच्या मधोमध चीनऐवजी भारताकडे प्रवासाला सुरुवात केली आहे. तसेच आणखी एक स्वेझमॅक्स टँकर, जे कझाकिस्तानचे CPC ब्लेंड क्रूड घेऊन रशियातील नोवोरोसिस्क येथून निघाले होते, तेही चीनमधील रिझाओकडे जात होते, मात्र या जहाजानेही आपला मार्ग बदलला आहे. आता ते 25 मार्च रोजी गुजरातमधील सिक्का बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे.

जहाजांनी अचानक मार्ग का बदलला?

इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्धामुळे मध्यपूर्वेतून भारताला मिळणाऱ्या तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे इंधन टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेने भारताला तात्पुरत्या स्वरूपात रशियाकडून तेल खरेदी वाढवण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर भारतीय रिफायनऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत केवळ एका आठवड्यात रशियाकडून सुमारे 30 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले. त्यामुळे या जहाजांनी भारताकडे प्रवासाला सुरुवात केली आहे.

चीनला बसला मोठा धक्का

गेल्या काही महिन्यांत भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली होती, त्यामुळे चीन हा रशियाचा सर्वात मोठा ग्राहक बनला होता. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ही जहाजे भारताकडे वळल्यामुळे चीनसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे आता भारतासोबतच जपान आणि दक्षिण कोरिया यांनाही पुन्हा रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता आगामी काळात चीनकडे जाणाऱ्या रशियन तेलाच्या पुरवठ्यात आणखी घट होऊ शकते. हा चीनला मोठा धक्का मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *