
यानंतर गीतकार आनंद बक्षी यांना बोलावण्यात आलं. त्यांनी धून ऐकल्यानंतर काहीही न बोलता थेट बाथरूममध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा हे गाणं नाकारलं जाईल, असं वाटत होतं. पण काही वेळातच ते बाहेर आले आणि त्यांच्या ओठांवर शब्द होते, अरे रे रे ये क्या हुआ, तूने ना पहचाना…. अवघ्या 10 मिनिटांत या गाण्याचे बोल तयार झाले.