
राळेगाव तालुक्यातील आदिवासी मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी जिल्ह्यात चिंता वाढली आहे. मागील सहा महिन्यांत तब्बल 34 मुली गायब झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मुलींना फसवून बाहेरच्या राज्यांमध्ये पाठवल्याचे प्रकार उघड झाल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणात मजहर कुरेशी नावाच्या व्यक्तीवर मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर सत्य समोर आणावे, अशी मागणी स्थानिकांकडूनही होत आहे. एकूणच हे प्रकरण खूप गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.