Headlines

6 महिन्यात सगळं संपलं! पत्नी करायची नको तेच, नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

6 महिन्यात सगळं संपलं! पत्नी करायची नको तेच, नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
6 महिन्यात सगळं संपलं! पत्नी करायची नको तेच, नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल


छत्रपती संभाजीनगरImage Credit source: Tv9 Network

छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव शेणपूंजी परिसरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाने इतके भीषण रूप धारण केले की, एका २२ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पवन ज्ञानेश्वर भुते असे मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पवनचे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने रंगवण्याच्या वयात पवन आणि त्याच्या पत्नीमध्ये मात्र घरगुती कारणांवरून सतत खटके उडत होते. या दररोजच्या वादांमुळे पवन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. अखेर या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनप्रवास संपवला.

भावाच्या सतर्कतेमुळे घटना उघड

पवनने आत्महत्या केल्याचे सर्वात आधी त्याच्या शेजारी राहणाऱ्या भावाच्या लक्षात आले. खिडकीतून पाहिले असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. भावाने कोणताही विलंब न लावता तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तो तोडून आत प्रवेश केला. यावेळी पवनचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे.

अवघ्या सहा महिन्यांच्या संसाराचा असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलल्याने एक हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत असून वादाचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *