
सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे सुमारे ५०० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सध्या रेल्वेने ६ ते ७ तास लागतात. मात्र, बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास केवळ २ तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार असून दोन आर्थिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.