Headlines

मोठी बातमी! …हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी! …हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! …हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ


राज्यात सगळीकडे विधान परिषदेचीच चर्चा सुरू आहे, अशात महायुतीमध्ये नेत्यांची रूसवा-रुसवी सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे. मात्र, काही मतदारसंघात भाजपच्या महायुतीतील उमेदवारांनी बंडखोरी केल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची चिंता वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, संभाजीनगरमधील शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप या मित्र पक्षाबाबत मोठं विधान केलं होतं, यावर आता संजय शिरसाटांनी मत मांडलं आहे.

सत्तारांच्या या विधानानंतर अनेक दावे-प्रतिदावे झाले. जेव्हा संजय शिरसाटांना याबाबत विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले, “संभाजीनगरमधील जागा आम्हाला मिळायला हवी होती, मात्र ती मिळाली नाही हे आमचं दुर्दैव आहे.” पुढे शिरसाट म्हणाले, “पालकमंत्र्यांबाबत किंवा पक्षाबाबत नाराजी असते, ती व्यक्त करायला हवी, मात्र त्याला मर्यादा असते. कितपत बोलावं, हे नेत्यांनी समजायला हवं.” एकूणच सत्तारांच्या वक्तव्यावर शिरसाटांनी नाव न घेता थेट निशाणा साधला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *