
राज्यात यंदा अल निनोमुळे अवर्षणाची शक्यता व्यक्त केली जात असून काही भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरासरी पाऊस 92 टक्के राहण्याचा अंदाज असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ नये तसेच कमी पावसातही जास्त नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे.
दरम्यान, E85 fuel संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. केंद्र सरकारकडून इथेनॉल ब्लेंडिंगला प्रोत्साहन दिले जात असून 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले जात आहे.