
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही महत्त्वाच्या वस्तूंचा संबंध विविध ग्रहांशी जोडला जातो. त्यामुळे पीठ, हळद, मीठ, तांदूळ आणि मोहरीचे तेल या वस्तूंचे डबे पूर्णपणे रिकामे होणे शुभ मानले जात नाही. अशा वेळी घरात आर्थिक अडचणी, नकारात्मक ऊर्जा आणि कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याची धारणा आहे.