Nanded | हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील सोनाळा परिसरात एका शेतकऱ्याने नगदी पीक म्हणून हळदीची लागवड केली होती. मागील वर्षापासून हळदीकडे वळलेल्या या शेतकऱ्याला यंदा चांगले उत्पादन मिळाले होते. एकरी सुमारे 30 क्विंटल इतके उत्पन्न अपेक्षित असताना अचानक झालेल्या पावसाने परिस्थिती बदलली. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीमुळे…