
दान-पुण्य – चाणक्य नितीनुसार दान-धर्म कार्याला उगाच श्रेष्ठ म्हटलेले नाही. चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती दान करते ती वास्तवात सच्चा धनवान होतो. जे लोक वाईटकाळात गरीब आणि गरजवंताना मदत करतात, देव त्यांचा उद्धार करतात. अशा लोकांच्या सुख-संपन्नतेत कोणतीही कमतरता होत नाही. त्यामुळे दान नेहमी खुल्या हाताने करावे, आपल्या सामर्थ्यानुसार गरजवंताना दान करत जावे.