Headlines

Cricket : 4 वर्षांत तिसरा दौरा, टीम इंडिया 3 सामने खेळणार, टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर

Cricket : 4 वर्षांत तिसरा दौरा, टीम इंडिया 3 सामने खेळणार, टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर
Cricket : 4 वर्षांत तिसरा दौरा, टीम इंडिया 3 सामने खेळणार, टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर


सध्या भारतात आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचा ‘रन’संग्राम पाहायला मिळत आहे. अपवाद वगळता क्रिकेट वर्तुळातील बहुतांश खेळाडू या लीग स्पर्धेत खेळत आहेत. एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी ही चुरस पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने अवघ्या काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मायदेशातील काही मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार झिंबाब्वे क्रिकेट टीम 2002 नंतर 2027 साली भारत दौरा करणार असल्याचं निश्चित झालं. त्यानुसार टीम इंडिया मायदेशात झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे.

भारताचा झिंबाब्वे दौरा 2026

टीम इंडिया 2026 वर्षात झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती देत वेळापत्रक जाहीर केलं आहे. उभयसंघातील ही मालिका जुलै महिन्यात होणार आहे. एकूण 4 दिवसांत 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार 23 ते 26 जुलै दरम्यान ही मालिका पार पडणार आहे. एकाच मैदानात हे तिन्ही सामने होणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार राजधानी हरारे इथे हे सामने होणार आहेत.

सूर्यकमार यादव कॅप्टन

सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा नियमित टी 20i कर्णधार आहे. त्यामुळे या मालिकेतही सूर्याच नेतृत्व करेल, हे क्रिकेट चाहत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही.

टीम इंडियाला सुट्टी नाहीच!

टीम इंडियाचे खेळाडू टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएल 2026 मध्ये बिजी आहेत. त्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध मायदेशात भिडणार आहे. इंग्लंड, आयर्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाच्या झिंबाब्वे दौऱ्याची सुरुवात होईल.

भारताचा 4 वर्षांत तिसरा दौरा

दरम्यान टीम इंडियाचा 4 वर्षात हा तिसरा दौरा असणार आहे. टीम इंडियाने याआधी 2024 आणि 2022 साली झिंबाब्वे दौरा केला होता.

झिंबाब्वे-भारत टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 23 जुलै, हरारे

दुसरा सामना, 25 जुलै, हरारे

तिसरा सामना, 26 जुलै, हरारे

सूर्यासेनेचा झिंबाब्वे दौरा 2026

टीम इंडिया-झिंबाब्वे हेड टु हेड रेकॉर्ड

दरम्यान टी 20I क्रिकेटच्या इतिहासातील आकडेवारी पाहता टीम इंडिया झिंबाब्वेवर वरचढ असल्याचं सिद्ध होतं आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात एकूण 14 टी 20I सामने खेळवण्यात आले आहे. भारताने त्यापैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर झिंबाब्वेने भारतावर 3 सामन्यांमध्ये विजय साकारला आहे. टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत झिंबाब्वेला पराभूत केलं होतं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *