Headlines

Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्यावर पालिकेची कारवाई, जैन समाज नाराज, मंगलप्रभात लोढा पुढे सरसावले, पालिका आयुक्तांना धाडलं पत्र

Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्यावर पालिकेची कारवाई, जैन समाज नाराज, मंगलप्रभात लोढा पुढे सरसावले, पालिका आयुक्तांना धाडलं पत्र
Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्यावर पालिकेची कारवाई, जैन समाज नाराज, मंगलप्रभात लोढा पुढे सरसावले, पालिका आयुक्तांना धाडलं पत्र


Mumbai Dadar Kabutar Khana : दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असणारा कबुतरखान्याचा (Kabutar Khana) मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी रात्री मुंबई महानगरपालिकेचे (BMC) एक पथक त्याठिकाणी तोडकामासाठी गेले होते. मात्र, काही लोकांनी याठिकाणी एकत्र जमत पालिकेच्या कारवाईला विरोध केला. दरम्यान याच मुद्द्यवरून आता जैन समाज आक्रमक झाला असून याविरोधात आज (रविवारी) मुंबईत जैन समाजाकडून (Jain Community) शांतीदूत यात्रा काढून विरोध दर्शविण्यात आला.

तर दुसरीकडे या कारवाईचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटताना दिसत आहे. याच कारवाईवरून भाजपचे आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहत जनभावनेची दखल घेऊन सुवर्ण मध्य काढा, असे आवाहन केलं आहे.

जनभावनेची दखल घेऊन सुवर्णमध्य काढण्यासंदर्भात आयुक्तांना आवाहन

कबुतरखाना बंदीवरून मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहत पक्षी प्रेमी, साधु व नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती केली आहे. यासह या पत्रातून खाद्याअभावी कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूंकडेही लक्ष वेधले आहे. सोबतच आरे कॉलनी, बीकेसी, रेस कोर्स अशा विविध मोकळ्या पर्यायी जागांचा पर्याय सुचवत आणि जनभावनेची दखल घेऊन सुवर्णमध्य काढण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना आवाहन देखील केलं आहे.

पत्रातून नेमकं काय म्हणाले मंत्री मंगलप्रभात लोढा

1. कबुतरांना आहार देणे हे संबंधित आरोग्य समस्यांचे एकमेव कारण आहे की पर्यावरणीय प्रदूषण हे एक मोठे कारण आहे?

2. संबंधित भागधारकांशी संवाद साधून व्यवहार्य पर्याय शोधण्याशिवाय, एमसीजीएमने प्राण्यांच्या आहाराची दीर्घकाळ चालणारी सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा अचानक थांबवणे योग्य होते का?

3. कबुतरांच्या आहाराचे नियमन करण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था आखल्या जात आहेत का, की निर्बंध कायम राहतील?

4. या प्रकरणाचे सर्वंकष मूल्यांकन करण्यासाठी आणि शाश्वत, दीर्घकालीन उपाय सुचवण्यासाठी माननीय न्यायालयाच्या देखरेखीखाली तज्ञांची समिती स्थापन करता येईल का?

5. दरम्यान, बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यासारख्या नियुक्त केलेल्या खुल्या जागांना सुरक्षित आणि देखरेखीखाली कबुतरांच्या आहारासाठी तात्पुरते क्षेत्र म्हणून स्थान दिले जाऊ शकते का?

या समस्येवर तुमचे तातडीने लक्ष आणि विचारपूर्वक केलेले निराकरण सर्व संबंधित नागरिकांकडून मनापासून कौतुकास्पद ठरेल.

आणखी वाचा

कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक आलं, पण जमावाने रोखलं; मुंबईतील दादरमध्ये नेमकं काय घडलं?

दादरचा कबुतरखाना BMC ने ताडपत्री टाकून बंद केला, धान्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *