Dattatray Bharne On Budget | शेतकरी कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार, म्हणाले….

Dattatray Bharne On Budget | शेतकरी कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार, म्हणाले….
Dattatray Bharne On Budget | शेतकरी कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार, म्हणाले….


महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाद्वारे ‘विकसित महाराष्ट्र 2027’ या ध्येयाकडे राज्याने वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफीसंदर्भात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. ही योजना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ या नावाने जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “आजच्या अर्थसंकल्पातून सरकारने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकरी बांधव या निर्णयाची मोठ्या प्रमाणात अपेक्षा करत होते.” भरणे पुढे म्हणाले की, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे राज्यातील शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *