
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुन्हा एकदा सभागृहात मुंबई आणि विकासकामांबाबत बोलताना नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे मुद्दे मांडले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही, त्यामुळे कामं होत नाही असं सांगण्यात आलं. मात्र राज्यघटना आपण मानतो आणि त्यानुसार काम करावे लागते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात असल्याने घेता आल्या नाही. ओबीसी आरक्षण हेही महत्त्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार निवडणूक होईल. ओबीसी आरआरक्षणाच्या शिवाय निवडणुका नको होत्या, मात्र आता कोर्टाने आदेश दिले आहेत असे म्हणत एकनाथ शिंदेनी सभागृहात जोरदार बॅटिंग केली. तसेच, मुंबई (Mumbai) महापालिका आणि मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे (Uddhav Thackeray) बंधूंना टोला लगावला. तसेच, मिठी नदीच्या गाळाचा मुद्दा उपस्थित करत दिनो मोरियाला हे कंत्राट का दिलं, असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.
निवडणूक झाली नसली तरी कोणतही काम थांबलेल नाही. मुंबईत बदल होत आहे, हे छातीवर हात ठेवून विजयराव सांगा. मुंबईकर आमच्यासाठी फर्स्ट आहेत आणि इतरांसाठी कंत्राटदार फर्स्ट आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच चहल यांना बोलावले आणि खड्यांच्या संदर्भात सांगतील आणि त्यानंतर दोन फेजमध्ये सर्व रस्ते करण्याचे आदेश दिले. पहिला फेज पूर्ण झाला आहे, आपण काँक्रीटीकरण करत आहोत, त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल. मुंबई आणि एमएमआर रिजन 1.5 ट्रिलियन डॉलरची क्षमता आहे. आमच्यावर मुंबई तोडण्याचा आरोप होतोय पण आम्ही जोडणारे आहोत, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.
मराठी माणसासाठी काय केलं असं म्हणत अनेकजण गळे काढतात, मात्र तो बाहेर का फेकला गेला याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. कोणाच्या काळात हे बाहेर गेले, पत्राचाळीमध्ये कोणी माया गोळा केली? संक्रमण शिबिरात खुराड्यासारख ठेवण्यात आल ते मराठी माणस नाही का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला. मुंबईतील रमाबाई नगरमध्ये भाडं दिल जात नव्हतं, मी स्वत: चेक वाटून आलो. सर्व प्रकल्प जेव्हीत करायचे असा निर्णय आम्ही घेतला. गिरणी कामगार यांच्या संदर्भात ही बैठक झाल. ज्यादा इन्सेटिंव देऊन त्यातून निर्माण होणारी घर गिरणी कामगारांना देणार आहोत. 1 लाख लोकांचा आम्ही पहिल्यांदा सर्व्हे केला, किती पात्र लोक आहेत याची नोंद केल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल
मुंबईबाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल, क्लस्टरच्या माध्यमातून आपण अनेक योजना आणत आहोत. कोळी वाड्याच्याबाबत देखील आपण निर्णय घेतलाय, बदल घडवण्याचे काम आपण करतोय. धारावी हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे, आपण धारावीच्या विकासासाठी जमीन देतोय. पूर्वीच्या सरकारने निर्णय फक्त पात्र लोकांसाठी घेतला होता. पण आम्ही पात्र आणि अपात्र लोकांसाठी निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या जागेत प्लॅन सुरु झाला, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
तुम्ही तिजोऱ्या धुतल्या
मतदानाच्या आधी म्हणायचं मराठी मराठी आणि निवडून आल्यावर म्हणायचे कोण रे तू? असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीच्या काळात सर्व ठप्प होतं, मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचे काम केले. कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे आत्ता भ्रष्टाचाराचा आरोप करतात. आम्ही तर रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन ठाकरेंना लक्ष्य केलं.
दिनो मोरियाने तोंड उघडलं तर मोरया होणार
मिठी नदीततला गाळ कोण काढतोय, यांना गाळ काढायला मराठी माणूस नाही दिसला, तर दिनो मोरिया दिसला. तिथ यांना मोरे दिसला नाही. पण, दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होणार, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे ठाकरेंना इशाराच दिला. कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेडबॉडी चोरणारे आमच्यावर आरोप करत आहेत. कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?, असे सवाल करत एकनाथ शिंदेंनी सभागृहातून नाव न घेता थेट ठाकरे गटावर निशाणा साधला.
सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी योजना
पर्यावरणाच संरक्षण आम्ही बोलून नाही तर करुन दाखवतोय, पाणथळ, तिवरांची जंगल ही सर्व संरंक्षित करणार आहे. फनेल झोनचा मुद्दा आहे, त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास शक्य होत नाही. इमारतीची उंची वाढवता येत नाही, त्यामुळे आपण टिडीआर देण्याचा विचार करतो, हा टीडीआर विकून विकास करता येईल, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आपण नवीन योजना आणली, पालिकेचा एकही एचटीपी प्लॅन नाही. हे का नाही केले, गेली 20 वर्ष सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून काहींनी काम केले. आज सिलिंकवर गेलो तर परदेशात गेल्याचा भास होतोय, गिरणी कामगारांबाबत आपण प्रयत्न करतोय असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
हेही वाचा
आणखी वाचा