
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर 21 दिवसांनी त्यांच्या मुलाने पहिल्यांदाच शंका व्यक्त केली आहे. जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, अपघातातील ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. जय पवार यांनी अपघाताचे पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा महाराष्ट्रातील जनतेला हक्क असल्याचे सांगितले. त्यांनी VSR ला तत्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालावी आणि VSR च्या गैरकारभाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांना स्मरण करत शेवटी “मिस यू डॅड” असा भावनिक संदेशही व्यक्त केला आहे.