
आखाती देशांमध्ये सुमारे 40 दिवस चाललेला संघर्ष अखेर थांबला असून जगभरातून याबाबत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. युद्धामुळे होर्मूझ समुद्रधुनी बंद झाल्याने भारतासह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. यामुळे देशात एलपीजी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती.
युद्ध संपल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करत एलपीजी पुरवठ्यासाठी नवे निर्देश लागू केले आहेत. औद्योगिक क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारने नॉन-डोमेस्टिक गॅस कोट्यात वाढ केली आहे. मार्च 2026 पर्यंत एकूण 70% कोट्याबरोबरच अतिरिक्त 10% कोटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा अतिरिक्त कोटा त्या राज्यांना मिळणार आहे जेथे PNG पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल. त्यामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.