
देशभरात आज दहीहंडी उत्सावाचा जल्लोष पाहायला मिळत असून मुंबईसह महाराष्ट्रात गोविंद पथकांचे उंचच उंच मनोरे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील अनेक मंडळांकडून, राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडूनही मोठ-मोठ्या पथकांची सलामी देण्यात येत आहे. अगदी 9 ते 10 थरांपर्यंत गोविंद पथकांकडून सलामी दिली जात आहे.
छत्रपती गोविंदा पथकाने पुन्हा ९ थर रचण्याचा प्रयत्न केला, छत्रपती गोविंदा पथकाकडून ९ थर रचण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला, त्यांचा दुसरा प्रयत्न देखील अपयशी झाल्याचं पाहायला मिळालं.
लाखोंची बक्षीसं असणारी मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी म्हणजे वरळीच्या जांबोरी मैदानावरील परिवर्तन दहिहंडी 2025 होय. भाजपा मुंबईच्यावतीने येथे दहीहंडी उत्सव सुरू असून गोविंदा पथकांसह चाहत्यांचीही मोठी गर्दी येथे जमली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दहीहंडी सोहळ्याला उपस्थित राहत, येथे हंडी फोडली. त्यानंतर, येथील दहीहंड उत्सवात गोविंद पथकाने उंचच उंच थर लावून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.
ना. अॅड आशिष शेलार आणि भाजपा-मुंबई आयोजक अॅड. संतोष पांडे यांच्याकडून वरळीत परिवर्तन इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून ही मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव साजरा झाला.
येथील दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाने चक्क छावा सिनेमातील दृश्यच उंच मनोऱ्यावर सादर केले. यावेळी, छावा सिनेमातील अंगावर शहारे आणणारा वाघाच्या जबड्यात हात घातल्याचा सीनही केला.
छावा सिनेमातील छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत गोविंदांनी उंच मनोऱ्यावर उभे राहून सादरीकरण केले. यावेळी, कवी कलश यांच्या कविता, संभाजीराजेंची भेट हा सीन पाहून अनेकजण भारावून गेले
संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज भेट, तसेच संभाजीराजेंच्या शौर्याचं बलिदान या दृश्यातून साकारण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही भारावल्याचं दिसून आले, त्यांनी टाळ्या वाजवून गोविंदा पथकाला दाद दिली.
राणी द्विवेदी आणि त्यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो, ज्याप्रकारे गोविंदा पथकाने छावा साकारला आहे, छत्रपती संभाजीराजेंचं शौर्य मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले.
Published at : 16 Aug 2025 01:59 PM (IST)
मुंबई फोटो गॅलरी
आणखी पाहा