T20 World Cup 2026: पाकिस्तानचा गेम ओव्हर! आयसीसीचा एक निर्णय पडणार इंग्लंडच्या पथ्यावर

T20 World Cup 2026: पाकिस्तानचा गेम ओव्हर! आयसीसीचा एक निर्णय पडणार इंग्लंडच्या पथ्यावर
T20 World Cup 2026: पाकिस्तानचा गेम ओव्हर! आयसीसीचा एक निर्णय पडणार इंग्लंडच्या पथ्यावर


T20 World Cup 2026: पाकिस्तानचा गेम ओव्हर! आयसीसीचा एक निर्णय पडणार इंग्लंडच्या पथ्यावरImage Credit source: Icc X account

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये इंग्लंडची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा दारूण पराभव केला. त्यानंतर आता पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. खरं तर हा सामना पाकिस्तानसाठी शेवटचा सामना ठरू शकतो. कारण या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर उपांत्य फेरीचं गणित काही जुळणार नाही. पण पाकिस्तान या सामन्यात पराभूत होण्याची शक्यता आहे. अशी शक्यता वर्तवण्याचं कारण म्हणजे आयसीसीचा निर्णय.. हा निर्णय इंग्लंडच्या पथ्यावर पडेल, तर पाकिस्तानसाठी अडचणीचा ठरणार आहे. पाकिस्तान इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने नवी खेळपट्टी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही खेळपट्टी पाकिस्तानसाठी पराभवाचं कारण ठरू शकते. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असणार आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होत आहेत. त्यामुळे तिथल्या वातावरण आणि फिरकी खेळपट्टीशी जुळवून घेतलं आहे. भारताविरूद्धचा सामना वगळता इतर सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. पण पल्लेकेलेच्या नव्या खेळपट्टीवर गोलंदाजांना स्विंग आणि बाउन्स मिळू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला अडचणीचं ठरेल. कारण अशा इंग्लंडचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकतात. त्यांना अशा खेळपट्टीवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. गोलंदाज आणि फलंदाज आरामात या खेळपट्टीवर खेळू शकतात. त्या उलट पाकिस्तानचं आहे. पाकिस्तानचा संघ फिरकीवर अवलंबून आहे. फिरकीपटू ही पाकिस्तानची ताकद आहे. त्यामुळे जर खेळपट्टी बदलली तर पुढचा सामना हा पाकिस्तानसाठी शेवटचा ठरू शकतो. कारण फलंदाजांना फलंदाजी करताना अडचण येईल. तसेच गोलंदाजही फॉर्मात नाहीत.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, सुपर 8 फेरीतील मंगळवारी होणाऱ्या सामन्यासाठी आयसीसीने नवी खेळपट्टी तयार केली आहे. यामुळे इंग्लंडला थेट फायदा होईल. हा सामना पाकिस्तानला करो या मरोची लढाई आहे. जर या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. कारण पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे पदरी फक्त एक गुण पडला आहे. त्यात या सामन्यात पराभव झाला तर फार तर 3 गुण होतील. 3 गुणांवर उपांत्य फेरी गाठता येणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *