Union Budget 2026 : आर्थिक विकास दरात वाढ हे आमचं पहिलं कर्तव्य! सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात

Union Budget 2026 : आर्थिक विकास दरात वाढ हे आमचं पहिलं कर्तव्य! सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात
Union Budget 2026 : आर्थिक विकास दरात वाढ हे आमचं पहिलं कर्तव्य! सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक विकास दरात वाढ हे सरकारचे पहिले कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. गेल्या 12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारचा प्रमुख भर कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यावर आहे, ज्यामुळे आत्मनिर्भर भारत हे लक्ष्य साध्य करता येईल. देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे.

सीतारामन यांनी लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. गरिबांचे कल्याण करण्यावर सरकारचा सतत भर राहिला आहे. गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, भारताला बायोफार्मा उत्पादनाचा जागतिक हब बनवण्याची सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि रचनात्मक सुधारणा करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर कॅन्सर आणि मधुमेहावरील औषधे स्वस्त करण्यावरही भर दिला जाणार आहे. आर्थिक विकास वाढवणे हे सरकारचे मुख्य कर्तव्य असून, त्या दिशेने सातत्याने कार्य सुरू असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *