
“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे स्लोगन होतं. त्या भरवशावर सत्ता मिळवली. शेष नागावर पृथ्वी अशी अख्यायिका आहे तसं आयत्या बिळावर नागोबा अशी स्थिती आहे. महाराष्ट्र कुठे आहे आज? महाराष्ट्रात शेतकरी, बरोजगारी, गुंतवणूक कुठे आहे? केवळ घोषणा, लोकांची फसवणूक यासाठी महाराष्ट्राची जगभर चर्चा आहे. ड्रग्समध्ये महाराष्ट्र खूप पुढे गेलाय, चहापानाला का जायचं? हा प्रश्न आहे” अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो, शासनाकडून केवळ दोन ओळींची लाईन म्हटली जाते. यात कुठेही, कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करु नये. का करु नये? हा घातपात आहे की अपघात आहे? या संदर्भात महाराष्ट्रासह देशभर चर्चा आहे. सरकारची भूमिका संदिग्ध आहे. महाराष्ट्र बघतोय, अशावेळी आम्ही का जायचं” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
“भारत-अमेरिका ट्रेड डीलनंतर काय परिणाम होणार? यावर मुख्यमंत्र्यांकडून काही आलं का? मक्यावर काय परिणाम होणार? तूरडाळ या पिकांची कबंरडं मोडलं जाणार. महाराष्ट्रात MSP ने कुठेही शेतकऱ्यांचा माल विकत घेतला जात नाही. सीसीआयए कापूस खरेदी निम्म्यावर आली. जाचक अटी घातल्या. 40 ते 45 टक्के कापूस शेतकऱ्याच्या घरात पडून आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली. हे सरकार कुंभकर्ण आहे. शेतकऱ्यांबद्दल अजिबात कणव नाही” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
यवतमाळ, मराठवाड्यात एका महिन्यात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या?
“सोयाबीनला 4 हजार रुपयांपलीकडे एक रुपया मिळाला नाही. सरकारला चॅलेंज आहे कुठेही MSP ने मक्याची खरेदी झाली का?. शासनाने खरेदी केली नाही. व्यापाऱ्यांनी सुद्धा जिवंतपणी मरण यातना देण्यासासारखा निर्णय घेतला. यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात 22 शेतकऱ्यांनी, मराठवाड्यात एका महिन्यात 76 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी आहे. दुर्देवाने महाराष्ट्रात एका शेतकऱ्याला सावकाराच्या कर्जामुळे किडनी विकावी लागते. शेतकरी लुटीचं काम सुरु आहे” अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
1500 च्या ठिकाणी 3000 का देत नाही?
“लाडक्या बहिणींमुळे कर्जबाजारी झालो असं भास्करराव बोलले.त्यामुळे बाकी योजनांना कात्री लावली. डावोसमध्ये जाऊन 30 लाख कोटींचे करार केलेत. आम्ही या संदर्भात व्हाइट पेपरची मागणी करणार आहोत, काढलाचा पाहिजेच. महाराष्ट्र पुढे चित्र आलं पाहिजे. एवढं जर होत असेल कर महाराष्ट्रातील बहिणींना 1500 च्या ठिकाणी 3000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहे. हे सर्व ढोंग आहे. महाराष्ट्र लुटला जातोय. प्रचंड भ्रष्टाचार आहे. कमिशनखोरी सरळसरळ 20 ते 25 टक्क्यावर जात आहे. महाराष्ट्रात तर सर्व कामं मॅनेज करुन दिली जात आहेत. कुठल्याही कामात स्पर्धा होत नाहीय. सर्व कमिशन घेतली की कामं वाटली जातात” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.