Headlines

शिवाजी कोण होता?..पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ,गायकवाड यांची दिलगिरी म्हणाले, ‘बापाचे नाव देखील एकेरी…

शिवाजी कोण होता?..पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ,गायकवाड यांची दिलगिरी म्हणाले, ‘बापाचे नाव देखील एकेरी…
शिवाजी कोण होता?..पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ,गायकवाड यांची दिलगिरी म्हणाले, ‘बापाचे नाव देखील एकेरी…


दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अपशब्द वापरून शिवीगाळ करणारे शिवसेनेचे बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.मी जे काही त्यांना शिवीगाळ केली त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा पत्नीबद्दल जे काही बोललो असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र महाराजांचे नाव सन्मानजनक घ्यावे, त्यांचे नाव एकेरी करुन करोडो हिंदूंच्या दैवतांचा अपमान करु नये असेही आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरुन पुन्हा महाराष्ट्रात वाद सुरु झाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या शिवीगाळ प्रकरणावरुन पुरोगामी वर्तुळात संताप व्यक्त होत होता. समाजमाध्यमात यावरुन संजय गायकवाड यांच्या शिवराळ भाषेवरुन टीकेची झोड उठली होती. या व्हिडीओ वरुन वादंग उठल्यानंतर आज आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतू महाराजांचे नाव सन्माजनकपणे छत्रपती शिवाजी महाराज असे घ्यावे. आपण आपल्या बापाचे नाव देखील एकेरी घेत नाही. त्यामुळे या पुस्तकाचे वाचन करताना महाराजाचे नाव संपूर्ण घ्यावी, मग हवे तेवढे वाचन करावे आम्ही देखील ऐकायला येऊ. परंतू महाराजांचे नाव एकेरी घेऊन करोडो हिंदूंच्या दैवताचा अपमान करु नये असेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

हे पुस्तक पुन्हा चर्चेत

शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली आहे. या पुस्तकाचे प्रकाशित होऊन अनेक वर्षे झाली आहेत. या पुस्तकावरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला शिवीगाळ केल्याने हे पुस्तक पुन्हा चर्चेत आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दोन दिवसांपूर्वी बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी अपशब्द वापरत शिवीगाळ केली. त्यांना पानसरे यांच्या जागी पाठवण्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते. यावरुन पुरोगामी वर्तुळात खळबळ उडाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *