
“मी सैराटसारख्या फिल्मकडे कधीच एक आव्हान म्हणून पाहिलेलं नाहीये. मला जे काही सांगायचे होते, ते मी फिल्ममधून मांडले आहे. सहसा आपल्याला असं वाटतं असतं की, सगळ्या लव्ह स्टोरीचा शेवट हा ‘हॅपी एंडिंग’नं होतो, पण तसं नसतं. त्यातील खऱ्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे जे वास्तव आहे, ते मांडणं हाच माझा दृष्टिकोन होता” असे नागराज मंजुळे यांनी म्हटले आहे.