Headlines

हेच ‘ते’ कारण ज्यामुळे तुम्ही वयस्कर दिसता आणि केस गळू लागतात… जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

हेच ‘ते’ कारण ज्यामुळे तुम्ही वयस्कर दिसता आणि केस गळू लागतात… जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
हेच ‘ते’ कारण ज्यामुळे तुम्ही वयस्कर दिसता आणि केस गळू लागतात… जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट


आजच वातावरण, भेसळयुक्त पदार्थ, फास्ट फूड, बदलती जीवशैली… यासर्व कारणांमुळे आपल्या जीवनावर परिणाम होते. तर धकाधकाच्या जीवनामुळे तर अनेक समस्या पुढे उभ्या राहतात. तर तुमच्या ही आजूबाजूला अनेक लोक आहेत ज्यांचा चेहरा वयाच्या तिशीपूर्वीच पूर्णपणे बदलतो आणि केस गळायला लागतात. अकाली वृद्धत्व आणि अचानक केस गळणे ही आजकाल अनेक लोकांना सतावणारी एक मोठी समस्या आहे. जीवनशैली, झोपेचा अभाव, ताणतणाव, आहार इत्यादी सर्व यामागील कारणे आहेत. आपल्या विशी, तिशी आणि चाळीशीत आणि त्यानंतरही आपल्या त्वचेला खरोखर कशाची गरज आहे, हे समजून घेतल्यास आपण अकाली वृद्धत्व आणि केसगळतीवर नियंत्रण मिळवू शकतो. तर जाणू घ्या, त्वचारोगतज्ञ डॉ. निशिता रांका याबद्दल तुम्हाला काय सांगतात.

जरी आपण याकडे फारसे लक्ष देत नसलो तरी, आपला मानसिक ताण हे आपल्या त्वचेवर आणि केसांवर थेट परिणाम करणाऱ्या मुख्य कारणांपैकी एक आहे. जेव्हा ताण वाढतो, तेव्हा शरीरात कॉर्टिसोल या हार्मोनचे उत्पादन वाढते. यामुळे त्वचेतील कोलेजन नष्ट होते आणि चेहऱ्यावर व त्वचेवर सुरकुत्या येतात. ताणामुळे होणाऱ्या अचानक केसगळतीला टेलोजेन इफ्लुव्हियम असे म्हणतात.

झोपेचा अभाव हे अनेक आरोग्य समस्यांचे मूळ कारण आहे. आपण झोपतो तेव्हा त्वचेच्या पेशी स्वतःची दुरुस्ती करतात. जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक नाहीशी होते. त्याचप्रमाणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. यामुळे आपण वयस्कर दिसू शकतो. यावर त्वरित उपचार न केल्यास, नंतर ही स्थिती पूर्ववत करणे कठीण होऊ शकते.

आपल्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ बाह्य संरक्षण पुरेसे नाही. आतूनही त्याची गरज असते. हे मुख्यत्वे आपण खात असलेल्या आहारावर अवलंबून असते. व्हिटॅमिन बी12, डी, लोह आणि जस्त यांची कमतरता हे केस गळण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्याचप्रमाणे, आहारात साखरेच्या अतिसेवनामुळे त्वचेची लवचिकता कमी होते. यामुळे ग्लायकेशन नावाची प्रक्रिया घडते आणि त्वचा वृद्ध दिसू शकते.

वृद्धत्वाची 80 टक्के प्रक्रिया सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होते. आपल्या देशातील सध्याच्या उष्ण हवामानात, सनस्क्रीन न लावता बाहेर गेल्याने अशा अतिनील किरणांचा हल्ला होऊ शकतो. यामुळे कालांतराने त्वचेवर काळे डाग पडू शकतात आणि त्वचेची लवचिकता कमी होऊ शकते. अनेक त्वचारोगतज्ज्ञ घरात असतानासुद्धा चांगले सनस्क्रीन वापरण्याची शिफारस करतात.

जाहिरातींमधील प्रॉडक्ट पाहून स्वतःहून प्रयोग करणे नुकसानकारक ठरू शकते. तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुकूल नसलेल्या क्रीम्स वापरल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. तसेच, रसायने असलेल्या शॅम्पूचा अतिवापर केल्याने केसांच्या मुळांना इजा होऊ शकते आणि केस गळू शकतात.

शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास त्वचा आणि केसांसाठी समस्या निर्माण होतात. त्वचा ओलसर ठेवल्याने सुरकुत्या काही प्रमाणात टाळता येतात. त्याचप्रमाणे, हायड्रेशनमुळे केसांची मुळेही मजबूत होतात. केसगळती टाळण्यासाठी टाळूच्या आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *