
दररोज नवीन गाणी प्रदर्शित होत असली, तरी जुन्या रोमँटिक गाण्यांची जादू आजही लोकांच्या मनात कायम आहे. सोशल मीडिया, यूट्यूब आणि इंस्टाग्राम रील्समुळे ही गाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. विशेष म्हणजे, आताची तरुण पिढी देखील ही गाणी आवडीने ऐकत आहे. जुन्या गाण्यांचे बोल सोपे आणि हृदयस्पर्शी असायचे, ज्यामध्ये खऱ्या भावना स्पष्टपणे जाणवायच्या. यामुळेच ‘मुघल-ए-आझम’, ‘आराधना’ आणि ‘कटी पतंग’ सारख्या चित्रपटांतील गाणी आजही सर्व वयोगटातील लोकांना आवडतात.