
कथानकातील वेगळेपण, भावनिक गुंतवणूक आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळे प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका ज्या आठवड्यात लाँच झाली, तेव्हा एक अनोखा उपक्रम राबवला गेला. पमा परब आणि तिच्या कुटुंबाने 7000 हून अधिक स्वामी भक्तांसोबत ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’ पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद केली.