
आखाती देशातील युद्धाची धग अजूनही पेटलेलीच असल्याचं दिसून येत आहे. इराण आणि अमेरिकेचा करार फसला असून पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता आहे. आधीच या युद्धामुळे अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्यामुळे भारतातही ऊर्जा स्त्रोतांची प्रचंड चणचण निर्माण झाली होती.
या दरम्यानच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मुंबईसह उपनगांमध्ये सीएजीच्या दरांमध्ये किरकोळ वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. हे दर 82 रुपयांवर पोहोचले असून महानगर गॅस लिमिटेडकडून किरकोळ दरातच प्रति किलो 1 रुयाने वाढ करण्यात आली आहे. यामुळे युनिअन ऑटो रिक्षाच्या भाड्यातदेखील एक रुपयाने वाढ करण्याची मगणी केली जात आहे. एकूणच या दर वाढीमुळे समान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.