Headlines

तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होतील चुटुकीसरशी

तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होतील चुटुकीसरशी
तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होतील चुटुकीसरशी


5 Government apps: भारत वेगाने डिजिटल बनत आहे. आता अनेक सरकारी सेवांसाठी मोठ्या लाईनत उभे रहाण्याची गरज नसते. तुमचा स्मार्टफोनचे अनेक गरजेच्या कामाचे माध्यम बनलेला आहे. ओळख द्यावयाची असो, पैसे पाठवणे, वा महत्वाची सरकारी दस्ताऐवज सांभाळण्याचे काम असो, सर्वकाही मोबाईल ॲपद्वारे सहज होत आहे. सरकारने देखील काही ॲप लाँच केले आहेत. जे सर्वसामान्याचे जीवन सहज आणि सोपे करत आहेत.

हेॲप न केवळ वेळ वाचवत आहे.तर ते सुरक्षा आणि सुविधा वाढवत आहेत. आजच्या काळात प्रत्येक भारतीयांच्या मोबाईलमध्ये काही सरकारी ॲप असणे खूपच गरजेचे आहे. हे ॲप तुम्हाला घर बसल्या अनेक काम करण्याची सुविधा देत आहेत. आणि सरकारी सेवांना तुमच्या हातात आणत आहेत.

Aadhaar App

Aadhaar ॲपद्वारे तुम्ही तुमचे ओळखपत्र मोबाईलमध्ये ठेवू शकता. आता फिजिकल कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही. यात क्युआर कोड स्कॅन, e-KYC आणि बायोमेट्रिक लॉक सारख्या सुविधा मिळतात. यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहाते आणि गरज असेल तेव्हा ही कागदपत्रे वापरता येतात.

DigiLocker

DigiLocker एक डिजिटल लॉकर सेवा ॲप आहे. यात तुम्ही तुमची इतर सरकारी कागदपत्रे ई-फाईलच्या रुपात सुरक्षित ठेवू शकता. यात ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड आणि एसएससी, एचएससी, पदवी अशा मार्कशिट्स डॉक्युमेंट स्वरुपात जतन करु शकता. हे दस्ताऐवज कायदेशीर रित्या मान्य होतात. आणि तुम्ही हे कुठे ही शेअर करुन तुमची अडलेली सरकारी कामे करु शकता.

UMANG

UMANG ॲप हे एकाच जागी अनेक सरकारी सेवा देते. यात तुम्ही बिल भरु शकता. आणि पीएफ बॅलन्स देखील पाहू शकता. गॅस बुक करु शकता आणि अन्य अनेक कामे करु शकता. हे ॲप अनेक भाषेत काम करते. त्यामुळे प्रत्येक राज्यातील लोक यास सहज वापरु शकतात.

mParivahan

mParivahan ॲपमध्ये तुम्ही ड्रायव्हींग लायसन्स आणि RC ची डिजिटल कॉपी ठेवू शकता. हा दस्ताऐवज ट्रॅफीक पोलिसांना मान्य असतो. यासाठी सोबत कागदपत्रे बाळगण्याची काही गरज नाही.

BHIM

BHIM ॲपद्वारे तुम्ही मोबाईल द्वारे तुरंत पैसे पाठवू किंवा मिळवू शकता. ही UPI वर आधारित आहे. आणि याचा वापर सहज करता येतो. हे सर्वॲप लोकांचे जीवनाला सोपे बनवत आहेत. यामुळे कागदाची गरज कमी होते. वेळ वाचतो आणि सरकारी कामे लवकर होतात. हे ऐप आज डिजिटल भारताचा एक महत्वाचा भाग बनले आहेत. जर तुमच्या मोबाईल फोनमध्ये हे ॲप नसतील तर तुम्ही अनेक सुविधांपासून वंचित राहू शकता. यामुळे या ॲपना लागलीच डाऊनलोड करणे गरजेचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *