Headlines

भारत रशियाला ज्याची धाकधूक तीच मोठी घोषणा, अखेर लागली वाट, थेट युरोपियन युनियननेच..

भारत रशियाला ज्याची धाकधूक तीच मोठी घोषणा, अखेर लागली वाट, थेट युरोपियन युनियननेच..
भारत रशियाला ज्याची धाकधूक तीच मोठी घोषणा, अखेर लागली वाट, थेट युरोपियन युनियननेच..


इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मात्र, नुकताच रशियाला धक्का देणारी बातमी पुढे येत आहे. या युद्धादरम्यान रशिया आणि इराण यांच्या तेलावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही निर्बंधे फक्त काही दिवसांकरिता हटवण्यात आली. युद्धात होर्मुज खाडी ठप्प असल्याने जगातील अनेक देश संकटात आहेत. त्यामुळेच यांच्या तेलावरील निर्बंध हटवण्यात आले. यादरम्यानच युरोपियन युनियनचे (EU) व्यापार आयुक्त मारोस सेफकोविक यांनी रशियाला धक्का दिला. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिका भविष्यात रशियावर लादलेले तेल निर्बंध कोणत्याही परिस्थितीमध्ये शिथिलता देणार नाही. धक्कादायक म्हणजे हे विधान त्यांनी अशावेळी केले, ज्यावेळी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्यावर त्यांची उच्चस्तरीय बैठक झाली.

इराण आणि अमेरिका युद्धात रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवण्यात आले. त्याला मुदतवाढ देखील देण्यात आली.  सेफकोविक म्हणाले की, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांना सांगण्यात आले की, ही सवलत फक्त काही देशांकरिता देण्यात आली. कारण तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. कठीण परिस्थितीमध्ये लढण्याकरिता ही एक मदत होती.

यानंतर आता भारतात थेटपणे याचे परिणाम दिसू शकतात. भारत हा रशियाकडून सर्वाधिक तेल आयात करतो. या वाईट काळात भारताच्या मदतीला रशिया धावून आला. रशियाने मोठी मदत भारताला केली. 16 मे पर्यंत रशियाकडून तेल खरेदीची मुभा आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 30 ते 35 टक्के तेल रशियाकडून आयात करतो. पुन्हा रशियाच्या तेलावर निर्बंध घातली तर भारत संकटात येईल.

अमेरिका आणि इराण युद्ध थांबल्यानंतरही होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता काही महिन्यांच्या कालावधी लागणार आहे. यामुळे भारतापुढे मोठी चिंता आहे. भारताला आता इतर पर्यायांचा विचार करावा लागू शकतो. आफ्रिका, व्हेनेझुएला किंवा थेट अमेरिकेकडून तेलाची आयात वाढवणे. मात्र, रशिया भारताला त्यांच्या तेल खरेदीवर मोठी सूट देतो. जर भारताने इतर देशांकडून तेल खरेदी वाढवली तर भारतासाठी ते अधिक तोड्याचे ठरणार आहे. भारत सध्याच्या घडीला प्रत्येक गोष्टीवर विचार करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *