Headlines

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा, चार दिवसानंतर… तुमचा नंबर त्यात तर नाही ना?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा, चार दिवसानंतर… तुमचा नंबर त्यात तर नाही ना?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा, चार दिवसानंतर… तुमचा नंबर त्यात तर नाही ना?


महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या केवळ काही महिने आधीच त्यांची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ घोषित केली. ज्या अतंर्गत राज्यातील आर्थिकदृष्यट्या दुर्बल महिलांना दरमहा पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्यभरातील 2 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदवलं, आणि पात्र लाभार्थी महिलांना तेव्हापासून दरमहा 1500 रुपये दिले जातात. दर महिन्याचे पैसे त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होत असतात. या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतलाच, त्याचा महायुती सरकरालही मोठा फायदा झाला. लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत भरभरून मतादन केल्याने महायुतू सरकार पुन्हा सत्तेत आलं. मात्र आता याच लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ च्या ऑनलाइन ग्राहक ओळख (अर्थात ई-केवायसी) प्रक्रियेची मुदत संपण्यासाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. 30 एप्रिल हा शेवटचा दिवस असणार आहे. ई-केवायसीसाठी महिला व बाल विकास विभागाने आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र अजूनही सुमारे 26 लाख बहिणींनी ईकेवायसी केलेली नाही, त्यामुळे येत्या 4 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाह तर लाखो महिला अपात्र ठरू शकतात.

लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा

लाडकी बहीण योजनेच्या राज्यात 2 कोटींपेक्षा जास्त , जवळपास 2 कोटी 47 लाख महिला लाभार्थी आहेत. पण जवळपास 26 महिलांकडे ई-केवायसी करण्यास पुरेशी कागदपत्र नसल्याने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत आत्तापर्यंत 3 वेळा वाढवण्यात आली आहे. आता 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख असून त्यानंतर ज्या महिलांची ई-केवायसी नसेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

महिला व बाल विकास विभागाने मुदतवाढ दिली होती, मात्र अजूनही 26 लाखांपक्षा अधिक महिलांनी ई-केवायसी केलेलीची नाही. आज 27 तारीख आहे, त्यामुळे ही मुदत संपण्यासाठी आता फक्त 4 दिवस (30 एप्रिल) उरले आहेत. मात्र या लाभार्थी महिला शेवटच्या 4 दिवसांत ई-केवायसी पूर्ण करतील, याची शक्यता कमी असून त्यामुळेच एप्रिलनंतर लाखो लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता महिला व बालविकास विभागाने व्यक्त केली. 30 एप्रिल रोजी बंक बंद होईपर्यंत या योजनेची पडताळणी सुरू राहार आहे, या चार दिवसांत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे 26 लाख लाभार्थी योजनेतून कायमचे बाद होऊ शकतात. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीमनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी लवकरता लवकर प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्याेना योजनेचा लाभ आणि मिळणारे पैसे यांच्यापासून वंचित रहावे लागू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *