
दुसरीकडे, रितेश देशमुखने स्पर्धकांना खास भेट देत त्यांचं कौतुक केलं आहे. या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे महाअंतिम सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे. या दैदिप्यमान सोहळ्यात कोल्हापूरची शुभ्रा खाडे, ठाण्याचा अर्णव बोपलकर, नांदेडची विरा हाक्के, नाशिकची अस्मिता गादेकर, पुण्याचा गंधर्व चामनर आणि ईशानी हिंगे या सहा स्पर्धकांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे.